Thursday, December 12, 2019

देश की पुकार - शरद पवार


*देश की पुकार - शरद पवार*



देश में पिछले कई दिनों से जिस तरह से ईडी, सीबीआई, न्यायपालिका, चुनाव आयोग, विश्वविद्यालय, हर एक सरकारी संस्था की स्वायतत्ता खत्म कर उसे गिने-चुने व्यक्तीयों की गुलाम बनाने की हर कोशिश हो या सभी राज्यों के चुनाओं में करि जाने वाली लोकतंत्र और संविधान के हत्या की साजिश हो, हर राज्य चाहे वो कर्नाटक हो या गोवा, बिहार हो या मिजोरम उन सभी राज्यों की तरह महाराष्ट्र में भी मोदी-शाह का फ़ासीवादी जहर उगलना अपेक्षित ही था और जो उन्होंने आगे चलकर सिद्ध भी कर दिया !

महाराष्ट्र के राजनितिक घटनाक्रम में लोकतंत्र को पैरो तले रौंदके, नैतिकता के सारे वस्त्रहरण कर जिस तरह भाजपा ने रात के अंधेरे में राजनीती का नंगा नाच किया उस तरह के एकतरफा युद्ध में जमीन पर अपने पैर मजबूती से जमाकर ८० साल का एक "युवा" योद्धा उठ खड़ा हुआ और सत्ता के घमंड में चूर तानाशाह को ऐसी करारी शिकस्त दी जिसकी चिंगारी पुरे देश में भडकनी चालू हो गई, उस योद्धा का नाम है "शरद पवार" !

महाराष्ट्र चुनाव में विपक्ष के लगभग सभी जीतनेवाले उम्मीद्वारोंको साम, दाम, दंड, भेद की निति अपनाकर भाजपा में शामिल करवाके माहौल बनाना, इसके बावजूद पवार को जब लोगों का साथ मिलता दिखा तो फिर उनको भी ईडी की फर्जी नोटिस भेज कर लोगों में भ्रम पैदा करवाने की कोशिश करना, नई उम्मीद और नए लोग लेके पवार ने फिर से चुनौती दी तो उनके कई प्रमुख कार्यकर्ताओं को लोगों तक पहुँचनेही न देना, उनकी हर तरफ से नाकाबंदी करने की हर "अनैतिक" कोशिश करना, इन सब के बाद भी चुनाव परिणामों में जब जनता ने उनके साथ खड़ा होने का फैसला दिखाया तो राज्यपाल और राष्ट्रपति भवन का पूरा पूरा दुरूपयोग करके सत्ता हथियानेकी हर कोशिश करना - मोदी-शाह के इन सभी क्रूर पैतरों पे भारी पड़े ८० साल के "युवा योद्धा" शरद पवार !
लोगों ने उनमे जिस तरह से एक योद्धा देखा उसी तरह उन्होंने भी अपनी हर चाल एक योद्धा के तरह ही चली !

आज देश में शरद पवार ही एक अकेले व्यक्ति है जो अमित शाह और मोदी के बर्बरताभरी नीतियोंको रोक सकते है और ये बात सामाजिक जीवन में कार्यरत हर नागरिक, सामाजिक कार्यकर्ता, बुद्धिजीवी लोग, हर नेता और पार्टी बखूबी जानती है चाहे वो मुलायम-अखिलेश हो या मायावती, ममता बनर्जी हो या अरविन्द केजरीवाल, फ़ारुक़-ओमर अब्दुल्ला हो या मेहबूबा मुफ़्ती, नितीश कुमार हो या लालू यादव, नवीन पटनायक हो या कुमारस्वामी-देवेगौडा, जगनमोहन रेड्डी-चंद्राबाबू-के.चंद्रशेखर राव हो या उद्धव ठाकरे,
डीएमके हो या एआयडीएमके, कांग्रेस हो या सीपीएम ! इन सभी नेता और पार्टियों को जोड़के मोदी-शाह की बर्बरतापूर्वक नीतियोंसे देश को अगर कोई मुक्त कर सकता है तो वे शरद पवार ही है ! शरद पवार ही वो समंदर है जिसमे अलग अलग विचारधाराओंकी यह सभी नदियां मिलके मोदी-शाह को शिकस्त देके सर्वसमावेशक भारत के ढांचे को बचाया जा सकता है ! 

महारष्ट्र में जिस चिंगारी को जलाकर शरद पवार ने दिखाया है उस चिंगारी से देश में क्रांति की मशाल जलाने का भी दायित्व उनके ऊपर ही आता है क्यों की ये पुकार तो देश की है !

आज देश मांग रहा है लोकतंत्र को जिन्दा रखने का वो क्रांतियुद्ध और शरद पवार नाम का "युवा योद्धा" जिसका सम्मान करते हुए इन सभी पार्टी और नेताओंको हमारा विनम्र आवाहन के शरद पवार की तरफ एक कदम वो बढ़ाएं और शरद पवार भी देश ने लगाई हुई इस आस को जिन्दा रखे !

#लोकतंत्र_जिंदाबाद
# Jay Bharat 

Sunday, December 8, 2019

शिवाजी विद्यापीठ - एक दर्जेदार नाव


*शिवाजी विद्यापीठ - एक दर्जेदार नाव*

खरंतर शिवाजी हे आपलं दैवत. या नावाचा संक्षिप्त उल्लेख होऊ नये... "शिवाजी" हे नावच अत्यंत दर्जेदार आणि अनादी काळापर्यंत चालावं आणि लोकांच्या तोंडात २४ तास रुळावं या उदात्त हेतूनेच संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा.यशवंतराव चव्हाण आणि विद्यापीठ स्थापना व नामकरण समितीच्या सदस्यांनी ज्यामध्ये प्रा. एन.डी.पाटील, डॉ.भास्कर पाटील, बाळासाहेब देसाई, डॉ.अप्पासाहेब पवार, अनेक प्रशासकीय अधिकारी यांसारख्या लोकांनी जाणीवपूर्वक विद्यापीठाचं नाव "शिवाजी विद्यापीठ" असंच ठेवण्याचा निर्णय घेतला.

VJTI सारखं नावाजलेलं अभियांत्रिकी कॉलेज - किती जणांना माहित आहे कि याच नाव "वीरमाता जिजाबाई टेकनिकल इन्स्टिटयूट" असं आहे ते?
CST - किती परदेशी पर्यटकांना किंवा देशभरातून करिअर साठी येणाऱ्या किती युवकांना माहित आहे कि हे नाव "छत्रपती शिवाजी टर्मिनल" असं आहे ते?
SGM कॉलेज कराड या रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेज मध्ये प्राध्यापक पदासाठी मुलाखती चालू होत्या. प्रा.एन डी पाटील हे मुलाखती घेत होते. एका प्राध्यापक-उमेदवाराला त्यांनी प्रश्न विचारला "तुम्हाला SGM चा अर्थ माहित आहे काय (सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज)?" त्यावर त्याचं "नाही" असं उत्तर !!!! :(


आपल्या भगिनी हादग्यामध्ये गाणी म्हणतात - "शिवाजी अमुचा राजा, त्याचा तो तोरण किल्ला..."
आपण घोषणा देतो - "जय शिवाजी"
३५० वर्षांपासून आपल्याकडे पोवाडे गेले जातात, "त्यास नाही जाणीव शक्तीची... शिवाजी राजाच्या कारामतीची..."

या सर्वांमध्ये "शिवाजी" असा उल्लेख हा अति-आदर, भक्ती, हक्क आणि प्रेम या भावनांचा सुंदर मिलाफ असतो..!!
अगदी तसाच जो प्रबोधनकार ठाकरे यांच्या "दगलबाज शिवाजी" किंवा कॉ.गोविंद पानसरे यांच्या "शिवाजी कोण होता" या पुस्तकांमध्येही आढळतो..!!
हा उल्लेख अगदी तसाच आहे जसा आपण "भैरूबाच्या नावानं... जोतिबाच्या नावानं.... नाईकबाच्या नावानं चांगभलं किंवा उदे ग अंबे उदे ..." असं अगदी भक्तिभावानं म्हणतो..!!
मराठी भाषेमध्ये आई, देव आणि राजा यांचा उल्लेख अति-आदर आणि जिव्हाळ्यामुळेच एकेरी केला जातो.

त्यामुळे समस्त कोल्हापूरकर, शिवभक्त आणि शिवाजी विद्यापीठाचे आजी-माजी विद्यार्थी यांनी शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलून "छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ (जे भविष्यात CSMUK असं काहीसं होऊन जाईल)" हे न करता "शिवाजी विद्यापीठ" असंच राहू देऊन लोकभावनेचा आदर करावा यासाठी चळवळ उभी करावी आणि शासनाला नाव बदलण्याचा निर्णय घेण्यापासून परावृत्त करावे हि नम्र विनंती..!

#माझेविद्यापीठशिवाजीविद्यापीठ

Wednesday, November 27, 2019

महाराष्ट्रातील जनतेचा विजय


*हा तर महाराष्ट्रातील जनतेचा विजय*


रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात भाजप ने केलेल्या लोकशाहीच्या हत्येने पेटून उठलेल्या महाराष्ट्रातील जनतेने सगळ्याच आमदारांना सकाळच्या लख्ख प्रकाशात येऊन उभा राहायला भाग पाडले.
माणसं पेटून उठली कि काय होतं हे गेल्या काही दिवसात सबंध भारताने पाहिलं.
कोणी काही लॉजिक लावो, कोणी कसलाही बुध्धीभेद करो, पण जनतेने अगदी मतदानानंतरही आपलं कर्तव्य चोख पार पाडलं.
दबाव असो किंवा लाच, महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांच्या दबावापुढे रात्रीच्या काळोखातली भाजप ची घाणेरडी कृत्यं सपशेल हरली हेच खरं..!!
ज्या क्षणी सत्तेसाठीची भाजपची काळी कृत्यं लोकांच्या नजरेस पडली त्या क्षणी माणसांनी फुटून जाण्याच्या मनस्थितीत असणाऱ्या आमदारांवर प्रचंड दबाव टाकायला सुरुवात केली. अगदी "साहेब, तिकडं जायचं असेल तर गावाकडं परत येऊ नका" असे त्यांच्या काळजातून आपसूक उमटलेले निरोपही धाडले.
याचाच परिणाम म्हणजे भाजप च्या हाताला एकही आमदार न लागणे.

संविधान बचावासाठी अहोरात्र प्रचार करणा-या सामाजिक संघटना, लोकशाहीवर प्रेम करणारे देशभरातील अनेक प्रादेशिक पक्ष आणि जनतेचे डोळे महाराष्ट्राच्या या लढाईकडे असे लागलेले होते जणू काही हि लोकशाही टिकवण्यासाठीची हि अंतिम लढाईच होती..!! 

सर्वात महत्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये एका मुरब्बी राजकारण्याचं रुपांतर संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी उभा ठाकणार्या एका योद्ध्यात झालं आणि माणसांनी या “८० वर्षाच्या लढवय्या योध्याला दिलेली उस्फुर्त साथ". माणसांनी जशी साथ दिली तशा एका योध्द्याकडून असणाऱ्या अपेक्षाही ठेवल्या. पवारांनीही हे पक्कं ओळखलं होतं कि जर त्यांनी भाजप ला सत्तेपासून रोखलं तरच या लढ्याला आणि माणसांच्या अपेक्षांना मूर्त रूप देता येईल आणि महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात याची नोंद सुवर्णाक्षरांनी होईल अन्यथा ती इतिहासाची काळी पाने ठरतील..!
आणि म्हणूनच राष्ट्रपती पदाच प्रलोभन, केंद्रात पद हे सगळं बाजूला सारून "एक मुरब्बी राजकारणी" नाही तर "एक योध्दा" म्हणून त्यांचे निर्णय आले..!!

शेवटी कसं आहे "जे महाराष्ट्राच्या मनात तेच शरद पवारांच्या"..!!!

लोकांचा आणि लोकशाहीचा विजय असो..!!

Jay BHARAT